Life Whatsapp Messages in Marathi

आयुष्य म्हणजे खेळ नव्हे, फुकट मिळालेला वेळ नव्हे
आयुष्य एक कोडं आहे, सोडवाल तितकं थोडं आहे
म्हणून म्हणतोय आयुष्यात येऊन माणसं मिळवावी
एकमेकांची सुख दुःखे एकमेकांना कळवावी


पाणी आयुष्यभर झाडाला मोठं करतं म्हणूनच की काय पाणी लाकडाला कधी बुडू देत नाही…
अगदी आपल्या आई-वडीलांसारखं


दुरावा कोणतंही नातं संपवत नाही आणि जवळीक कोणतंही नातं घट्ट करत नाही.
तर नात्यांची घेतलेली काळजी आणि केलेला सन्मान यामुळे नातं
अधिक मजबूत होतं आणि टिकतं देखील.
जीवन खुप सुंदर आहे फक्त तसं जगायला हवं


हसून पाहावं, रडून पाहावं, जीवनाकडे नेहमी डोळे भरून पाहावं
आपण हजर नसतानाही आपलं नाव कुणीतरी काढावं
माणसावर करावं की माणुसकीवर करावं, पण प्रेम मनापासून करावं


जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला कधीच परिस्थितीची करणे जोडू नका
कारण दिवा विझवायला नेहमी हवाच कारणीभूत नसते
कधी कधी दिव्यात तेल कमी असते


फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात.
पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची आयुष्यात प्रगती कायम होत राहते


Marathi Whatsapp Messages for life


जीवनाच्या प्रवासात सर्व काही शिकलो
आधार कुणी नाही देत परंतु धक्का द्यायला प्रत्येक जण तयार असतो
“माझं” म्हणून नाही, “आपलं” म्हणून जगता आलं पाहिजे
जग खूप चांगलं आहे, फक्त चांगले वागता आलं पाहिजे


आत्मविश्वासाने केलेल्या कार्याला कोणत्याही संकटाची भीती नसते
मुळात संकटे आपल्या आत्मविश्वासाची परीक्षा घेण्यासाठी बनलेली असतात.
या परीक्षेत जो उत्तीर्ण होतो तो जीवनात यशस्वी होतोच


आयुष्यात एखादी गोष्ट गमावल्यास कधीही वाईट वाटून घेऊ नका.
कारण जेव्हा एखादे झाड त्याचं पान गमावते तेव्हा त्याची जागा नवीन पान हे घेतच असते.
त्यामुळे आयुष्य खूप सुंदर असून आयुष्यावर व जगण्यावर विश्वास ठेवा


चांगली भूमिका, चांगली धेय्य आणि चांगले विचार
असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात
मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही


Life Messages in Marathi


जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते, पण वेळ बदलण्यासाठी दोनदा जीवन नाही मिळत.
नेहमी आनंदाने जीवन जागा


जीवन म्हणजे काय? – कधी स्वतःलाच फोन लावून बघा. लागणार नाही. तो व्यस्त दाखवेल. आपल्याकडे सगळ्यांसाठी वेळ आहे पण स्वतःसाठी मात्र आपण व्यस्त आहोत.


जीवन चहा बनवण्यासारखे आहे …
अहंकाराला उकळू द्या, चिंतांना वाफ होऊन उडून जाऊ द्या
दुःखांना विरघळून जाऊ द्या, चुकांना गाळून घ्या आणि
सुखाच्या आनंदाचे घोट हसत हसत घ्या


पूर्णविराम म्हणजे शेवट नाही, कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो.
त्याचप्रमाणे जीवनात अपयश आले तर तो खरा शेवट नसतो,तर ती नव्या यशाची सुरवात असते.
आनंदाने जीवनाची मज लुटा, दुःखाला दूर सारून प्रत्यन करा. हेच खरे जीवन होय.


अपेक्षा आशी असावी, जी ध्येयापर्यंत नेणारी …
ध्येय असं असावं, जे जीवन जगणे शिकवणार …
जगणं असं असावं, जे नात्यांची कदर करणारं …
नाती अशी असावीत, जी रोज तुमची आठवण काढण्यास भाग पडणारी …


जीवनाचे दोन नियम आहेत, बहरा फुलांसारखे, आणि पसरा सुगंधासारखे ….
कुणाला प्रेम देणं सर्वात मोठी भेट असते आणि कुणाकडून प्रेम मिळवणं सर्वात मोठा सन्मान आसतो …. !


Life Whatsapp Message in Marathi


एखादं स्वप्न पाहणं, ते फुलवणं, ते रस्त्यात उतरावं म्हणून धडपडनं
त्या धडपडीतला आनंद लुटणं आणि दुर्दैवाने ते स्वप्न भंग पावलं,
तरी त्याच्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या पायांनी दुसर्या स्वप्नामागे धावणं
हा मानवी जीवनाचा धर्म आहेच…. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो तो यामुळेच


जीवन बदलण्यासाठी वेळ सगळ्यांनाच मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही!
आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात, फरक हाच की आरश्यात सगळे दिसतात आणि हृदयात फक्त आपलेच!


जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा काहीतरी देण्यात महत्व आस्ते
कारण मागितलेला स्वार्थ आणि दिलेले प्रेम असते …


Life Messages in Marathi Language


ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो.
सत्कार्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या असतात,
याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपात नाही


आयुष्य फार सुंदर आहे… ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे


आयुष्यात जिंकाल तेव्हा असे जिंका की जणू विजयाची सवयच आहे…..
हराल तेव्हा असे हरा की जणू सतत जिंकायचा कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरले आहात !


जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका कारण उत्तम दिवस आठवणी देतात,
चांगले दिवस आनंद देतात,वाईट दिवस अनुभव देतात तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात


जीवनात चांगल्या आणि वाईट या दोन्ही वेळा आठवणीत थेवव्यत.
कारण वाईट वेळेस चांगल्या आठवणी मानस शांतता देतात आणि
चांगल्या वेळात वाईट आठवणी आपल्याला सावधान करतात


जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे. समुद्र गाठायचा असेल तर खाचखळगे पार करावेच लागतील.


जीवन खूप कमी आहे, ते आनंदाने जागा, प्रेम मधुर आहे त्याची चव चाखा !
क्रोध घातक आहे त्याला गाडून टाका, संकटे हि क्षणभंगुर आहेत त्यांचा सामना करा !
आठवणी या चिरंतन आहेत, त्यांना हृदयात साठवून ठेवा


संपूर्ण जग सुंदर आहे,फक्त तसं पहायला हवं.
प्रत्येक नातं जवळचं आहे,फक्त ते उमजायला हवं.
प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे,फक्त तसं समजायला हवं.
प्रत्येक वेळेत समाधान वं आनंद आहे, तसं जगायला हवं.


महत्व ह्याला नाही की कोण रोज आपल्या सोबत आहे
महत्व ह्याला आहे की गरज पडल्यावर कोण आपल्या सोबत आहे


ज्याच्यामुळे चार लोक आपल्याला ओळखतात त्याच्याच पाठीवर वार करायला बघू नका.
त्याचा मान राखा, आयुष्यात खूप पुढे जाल


आयुष्य नेहमीच एक संधी देते
सोप्या शब्दात त्याला आज म्हणतात