वादळे उठतात, किनारे सुटतात
नशिबाशी फुटतात लाटा
पाऊले थकतात शेवटी अवचित
जगण्याच्या वळतात वाटा
सारंगा रे सारंगा
माणसा ही तुझी गोष्ट आहे जुनी
चालताना पुन्हा सांगते रे कुणी
हुंदके सरतात, आसवे उरतात
जगण्याचा सलतोच काटा
हे ऋतू कोणते येत जाती असे
जीवनाला नवे देत जाती पिसे
थांबणे नसतेच, चालणे असतेच
रस्त्यांना फुटतोच फाटा
